गुरुवार, २१ एप्रिल, २०१६

कैफ

कैफ.
अंगात रग होती तारूण्याचा जोष होता
नव्हतीच जगाची पर्वा स्फुरत होते बाहू
वापरत होतो शक्ती वाट्टेल तशी
अंगातल्या त्या मस्तीच्या जोरावर
नडत राहीलो एकमेकाच्या साथीने
लुबाडत राहीलो असहाय्य दीनाना
पिडले गोरगरीबांना अगदी शरणार्थीनाही
सत्तेचा आणि शक्तीचा माज वाढत राहीला
काळ धावत होता बघत असहाय्यपणे
आणि मग एक दिवस भरले पापाचे घडे
नियती हसली  आपल्याकडे  बघत खदाखदा
आणि अखेर काळाने आपले कर्तव्य बजावले
झालो  आज गलितगात्र अंगातले त्राण संपले
नियतीच्या इशार्यावर नाइलाजास्तव
जेंव्हा आपण हत्यार टाकले मस्तवालपणाचे
आज झालो आहोत पुर्ण परावलंबी
आमचे कुत्रेही आता खात नाही हाल
काळाचीच ही कमाल  झालो बेहाल
झालोय एका एका घासासाठी महाग
नियती म्हणतेय ..
पुढच्या जन्मात तरी निट वाग !
    ,,,,,,प्रल्हाद  दुधाळ .

सोमवार, १८ एप्रिल, २०१६

पळपुटेपणा

पळपुटेपणा 
जेंव्हा आपण हत्यार टाकले 
आठवा कोण कसे ते वागले ?
अपयश प्रथमच चाखले 
पराजीत म्हणून कसे वाटले 
जगणे आहे रोजची लढाई 
जिंकण्याचीच का सदैव घाई?
कधी हरण्यात जीत असते 
माघारीत नवी रीत असते 
म्हणू दे कुणी पळपुटेपणा 
नक्कीच ठरेल शहाणपणा
हत्यार टाकून नाहीच हार 
होवू या परिस्थितीवर स्वार 
कधी जीत कधी योग्य माघार 
यशस्वी होण्याचा हाच आधार
                                        प्रल्हाद दुधाळ

बक्षीस.

बक्षीस.
नव्हती सोपी आत्म्याशी लढाई
गाडले षड्रिपुना खोल खाई
संवादाची उत्स्फुर्ते केली घाई
मनभेदाची शक्यता ती नाही


लुटूपुटूचा खरेतर तंटा
कारणाविनाच वाजला डंका
वांझोटया त्या होत्या शंकाकुशंका
मनस्वास्थ्यावरती वरवंटा


जिंकायाचे काहीच ना राहीले
शत्रू सगळे मातीस मिळाले
जेव्हा आपण हत्यार टाकले
बक्षीस मन:शांतीचे मिळाले

----प्रल्हाद दुधाळ

शनिवार, १६ एप्रिल, २०१६

त्याग!

त्याग!
गोष्टी अगदी छोट्या छोट्याशा  
उगाच केल्या त्या प्रतिष्ठेच्या
शब्दांची झाली मग हत्यारे
सुरू झाले वारावर वार
भडकली बदल्याची आग  
जळण्याची आणि जाळण्याची
चढाओढ मग जीवघेणी
वाद प्रतिवाद ओरखाडे
नात्यांची ससेहोलपट
मन:शांतीला सदा ग्रहण
एकदा म्हणाले अंतर्मन
कशापायी सारे कशासाठी?
उत्तर अर्थात-अहंकार
ठरवले-पुरे वेडेपणा!
समजून उमजून- जेंव्हा
आपण हत्यार टाकले ते
जीवन सारे सुंदर झाले
जीवनात आता तो केवळ
अनोखी शांती आणि आनंद!

-----प्रल्हाद  दुधाळ. 

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

लग्न


लग्न  *****
म्हणतात सगळे
लग्न म्हणजे असा लाडू
जो खाल्ला तरी पश्चात्ताप
ना खाल्ला तरी पश्चात्ताप
असेही म्हणतात ....
लग्न म्हणजे ....
क्षणभर मजा -
आयुष्यभराची सजा!
कुणी मानते त्याला....
हरवलेले स्वातंत्र्य.
जेव्हढी तोंडे तेवढ्या बाता!
खरच काय आहे लग्न म्हणजे ...?
लग्न म्हणजे सहजीवन
लग्न म्हणजे समर्पण
नाजूक नात्यांचे बंधन
लग्न म्हणजे हवी हवीशी तडजोड
किंचित आंबट भरपूर गोड!
लग्न म्हणजे त्यागातला
घेण्याबरोबर  देण्यातला आनंद!
लग्न म्हणजे कुटूंबसंस्था आधार
भारतीय संस्कृतीत मोलाचा संस्कार!
लग्नामुळेच बांधली जाते..
जन्म्मोजन्मीची गाठ
आजूबाजूला पहा जरा
 लग्नाविना कित्येकांच्या आयुष्याची
लागली आहे वाट!
तेंव्हा म्हणू दे कोणी काहीबाही
लग्नाशिवाय जीवनाला अर्थ नाही!
     ,,,,,,,,,प्रल्हाद दुधाळ .

बुधवार, १३ एप्रिल, २०१६

लग्न म्हणजे

-लग्न म्हणजे -
मोलाचा संस्कार
मनुष्य जन्माचा
सोहळा जीवांच्या
मिलनाचा
दोन कुटूंबाच्या
नात्यांची गुंफण
उत्कट ते क्षण
मुहूर्ताचे
जन्म त्या दोघांचा
एकमेकांसाठी
बांधलेल्या गाठी
विधात्याने
असावी ती साथ
सुखदु:खा मधे
सावराया उभे
एकदुजा
लग्न म्हणजे रे
जीवांचा तो मेळ
संवादाची वेळ
साधण्याचा
एकमेकाप्रती
असावा आदर
करावा संसार
आनंदाने
.........प्रल्हाद दुधाळ.


गुरुवार, ७ एप्रिल, २०१६

...सत्य

.........सत्य......
दिवस ढकलणे जगणे माझे
तू भेटण्याआधी घरावर ओझे 

नशिब माझे म्हणे होते करंटे
वाटेवर होते अगणित काटे
बोलत होते मजला कुचकामी
ओळख समाजात केविलवाणी
भुकेस कोंडा होता निजेस धोंडा
जेथे तेथे तुजसाठी मोठा लोंढा
भेटलीस तू खिसा खुळखुळला
अर्थ माझ्या खरा जीवनात आला
सत्य व्यवहारी जगाचे कळले
नोकरीने माझे भाग्य उजळले
,,,,,,,,,, प्रल्हाद दुधाळ