शनिवार, ३ जुलै, २०१०

आव्हान.

आव्हान.
वाटतय सगळ आहे आयुष्य सुरळीत तरी,
कधी गाफिल उगा राहू नयेच माणसान!
कधी अचानक गडगडाटी मुसळधार पाऊस,
गोठवणारी थंडी,जाळणार कडाक्याच उन,
घोंगावणार वादळ, भयानक त्सुनामी,
वेळ कधीच सांगुन येत नाही,
एक घरट जरूर उभाराव माणसान!
भले भले कोसळतात,जगण्याला कंटाळतात,
गोंधळात या काही संधिसाधू भेटतात,
एवढ्या तेव्ह्ढ्यान असं निराश नसतं व्हायचं,
प्रत्येक क्षण नवं आव्हान समजून,
आनंदानं सामोरं जात रहाव माणसानं!
अकल्पित अपेक्षाभंग,जिव्हारी घाव,
संकटामागुन संकटं,जुलूम जबरदस्ती,
धर्मांध दंगली,माथेफिरूंची मनमानी,
विश्वासानं अशावेळी मान टेकता येईल,
एकतरी असा आधार जोडावा माणसानं!
वाटतय सगळ आहे आयुष्य सुरळीत तरी,
कधी गाफिल उगा राहू नयेच माणसान!
प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा