मंगळवार, ३१ मे, २०११

शून्य!

शून्य!
आयुष्यातल्या निसरड्या क्षणी,
मला सावरलस,आधार दिलास.
जे क्षण मला पोहचवू शकले असते,
विनाशाच्या खाईत!
तू भेटलास,हात दिलास,
ज्या क्षणी....
माझं जीवन मी संपवलं....
आणि सुरू झालं,
आपलं जीवन!
जे तुझही आहे,माझही आहे.
तू आणि मी,
आता वेगळे कुठे आहोत?
तुझ्यातून मी,आणि माझ्यातून तू वजा जाता,
उरते फक्त ’शुन्य’
ऒदास्याचं!
प्रल्हाद दुधाळ.
......काही असे काही तसे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा