बोलण्याने!
किती दिवस पहाणार स्वत:चा अंत?
बाळगत रहाणार नशिबाची खंत!
हिमतीने भाग्यरेषा बदलायला हवी,
कोंडी ही आतातरी फुटायलाच हवी!
जीवन हे जगायच खेळत हसत,
कशास जगायचे असे धुसफुसत?
आतल्या आत असे नको बसू कुढत,
नको जगणे उगीच रडत खडत!
मोकळ वाटेल नक्कीच व्यक्त झाल्याने
दु:ख हलके होत असते बोलण्याने!
.........प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा