शनिवार, १७ मार्च, २०१८

कलियुग.


कलियुग.

बेफिकीर ते सारे मन्मानी करू लागले
आपल्याच कर्माने जितेजी मरू लागले

जन्मदात्यांचेही आता वाटे ओझे तयांना
स्वार्थांस्तव सांजसकाळी ठोकरू लागले

धैर्यशीलता न अंगी इच्छिले ते मिळाले    
समस्येने इवलाश्याही बावरू लागले

प्रतिष्ठा होती श्रमांना गेली लयास आता
गाळण्यास घामाला भले घाबरू लागले

लाऊन मुखवटा जगती नास्तिकतेचा  
भीतीने नरकाच्या मन पोखरू लागले  

काय ती वर्णावी कलियुगाची कथाव्यथा
जगल्याविनाच आयुष्य हे सरू लागले
..... प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा