कसोटी.
दिले धरावयास बोट
धरतात हात कोणी!
जगण्यातली जाते मजा,
आणतात वात कोणी!
कोजागिरीचा चन्द्र अन,
भरले फेसाळ पेले,
रसभंग झाला कसा,
केली अंधारी रात कोणी!
असतात शीते जेंव्हां,
जमतात भुते फार,
वेळ येता संकटाची,
सोडली ही साथ कोणी?
देव माणुनी पुजियले,
माणसे ती गेली कुठे?
येता क्षण कसोटी चा,
मारली ती लाथ कोणी?
प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा