गुरुवार, ८ जानेवारी, २०१५

कविता लिहिणं.

कविता लिहिणं.
ते नसतात काही पोकळ शब्द,
ओळ एक एक गुंफलेली असते, 
वास्तव वा कल्पनांच्या भरारीवर. 
एक एक अनुभव गुंफावा लागतो, 
जगावा लागतो पराकायेत प्रवेशून,
मांडायची असते घालमेल मनाची,
साधायचा असतो संवाद स्वत:शी,
मांडणे असते रोष व्यवस्थेवरचा,
असते समजूत घालणे स्वत:चीच.
असतो कधी उपदेशाचा अभिनवेश,
करायचा असतो भावनांचा निचरा,
सांगायचं असत अव्यक्त साठलेलं,
केवळ शब्दांचेच खेळ नसतातच ते,
ते नसतच नुसतंच कविता लिहिणं!
उद्गार तो भावनांचा,शब्दापलीकडच्या,
नकळत व्यक्त झालेला शब्दांमध्येच!
.........प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा