मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

बळीराजा

बळीराजा
राजा नावाचा रे  नेहमीच कंगाल
घामावर तुझ्या जगतात दलाल

कधी ओला कधी सुका झोडपे गार
चोहोबाजूंनी सदैव पडतो मार

पिकते तेव्हा मातीमोलाने विकते
कष्ट जाती वाया भांडवल बुडते

दावणीच्या  बैलाना चाराही मिळेना
लळा जित्राबांचा विकायाला धजेना

शेतीप्रधान देश घामा नसे मोल
शेतकरी  हिताचे सारे नारे फोल

येवो संकटे कितिही नाही हटणार
लवकरच राज्य बळीचे येणार
       ...... प्रल्हाद दुधाळ , पुणे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा