शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१२

जाणीव!

जाणीव!
वर्षे किती संपली?
दिवस कसे गेले?
आयुष्य इथवरचे,
झगडण्यात गेले!
जे होते माझ्यापाशी,
जाणीव नव्हतीच त्याची,
लालसेत ऎहिकाच्या,
आयुष्य कुढण्यात गेले!
पेलली किती ओझी,
एवढ्या खांद्या वरती,
करण्या सिध्द स्वत:ला,
वय धडपडण्यात गेले!
आज नव्याने पाहतो,
जीवनातले आनंद कण,
मानतो आभार मी,
निर्मिकाचे नियोजन,
नजरेत सुधारल्या,
जाहले, बरे झाले!
आयुष्य इथवरचे,
किती आनंदात गेले!
         प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा