मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

कहाण्या.

कहाण्या.
कधी कोरडा दुष्काळ
येतो कधी ओला काळ
वाढे व्याजावर व्याज
दारी सावकारी मागण्या!
होते वांझोटी पेरणी
सारे कधी जाते वाहुनी
पोसावे कसे परिवारा
लेकरांस केविलवाण्या!
पंचनामे ते जीव जाता
मारती ते मोठ्या बाता
मदतीच्या आकड्यांच्या
मिळती खोट्या बतावण्या!
किती संसार ते गांजले
रोजचेच हे रडे झाले
झाडा झाडाला विचारा
आत्महत्येच्या कहाण्या!
     .....प्रल्हाद दुधाळ.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा