कारण.
असेच हे तसेच का झाले?
भोग असे नशिबी का आले?
घोर मनी निराशा दाटता,
विषण्ण माझ्या मनांत आले!
प्रयत्नात ना कसूर झाले,
तन मन धनही ओतले,
खापर अपयशाचे फुटता,
विषण्ण माझ्या मनांत आले!
मठ मंदिरांचे खेटे झाले,
सत्संग नी कीर्तनही केले,
दैवावर हवाला ठेवता,
विषण्ण माझ्या मनांत आले!
बुद्धीवंत
दैववादी झाले,
प्रश्नांचे का
असे गुंते झाले?
कल्पनातीत काही
घडता,
विषण्ण माझ्या मनांत आले!
असंतुलन धरेचे झाले,
निसर्ग संपदेला लुटले,
तर्कसंगतीची ज्योत पेटता..
विषण्ण माझ्या मनांत आले!
.....प्रल्हाद दुधाळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा