बुधवार, ३१ मे, २०१७

सुख

सुख...
माणसाशी माझ्यातल्या
कित्येकदा मी भांडतो...
माणूसकी कशी फोल
कैफियत ही मांडतो...
यत्न किती केले त्यांनी
खोटेपण रूजवाया ...
विवेकाने दिला दगा
कष्ट त्यांचे गेले वाया...
महात्म्याच्या मर्कटांनी
केले योग्य ते संस्कार...
केले नाही ते वावगे
आला अंगी सदाचार...
जर आहे मती ठाम
मनी ये ना कुविचार...
पारदर्शी वागण्याने
सुख जीवा मिळे फार...
     .... प्रल्हाद दुधाळ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा