सोमवार, २१ जून, २०१०

गैरसमज.

गैरसमज.

माणसांना ज्या आयुष्यभर टाळले होते,
दु:खात माझ्या त्यांनीच आसू ढाळले होते.

फुल अर्पिले तुला जरी होते सुकलेले,
पाहीले मी तुझ्या गज-यात माळले होते.

रस्ता अवघड तो, वाट वळणांची आहे,
जाणुनही मार्ग काटेरी कवटाळले होते.

जंगलातली माणसे ती जसे पशुच ते,
साथ मिळताच ते माणसाळले होते.

पार्थिवाला माझ्या देता अग्नी कशाला?
आतल्या माणसाला केव्हाच जाळले होते.

प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा